narayanbuwa kane


गीत नानाई

पृष्ठ 9

असेच एकदा नाना कीर्तनासाठी गुहागरला जायला निघाले होते. मिरज स्थानकावर खूप गर्दी होती. चिपळूणकडे जाणारी पहिली गाडी पूर्ण भरून सुटली होती.नंतरची दुसरी गाडीही पूर्णपणे भरली होती. आता ही गाडी सोडली तर मग मुक्कामावर पोहोचायला उशीर होणार,कीर्तनाची वेळ पाळता येणार नाही, म्हणून नाना त्या गर्दीतच गाडीत चढले. गाडीच्या शेवटच्या पायरीवर उभे राहायला जेमतेम जागा मिळाली होती. मिरज सोडल्यावर लगेचच गाडीचा टायर फुटला व गाडी वेडीवाकडी होत नाना ज्या बाजूला दरवाजात उभे होते त्याच बाजूला पूर्ण पलटी झाली.आजुबाजुची उभी असलेली सर्व माणसं नानांच्या अंगावर कोसळली होती.एकच गोंधळ माजला होता. नानांना मुका मार खूप लागला होता,पण सुदैवाने मोठी दुखापत झाली नव्हती. कसेबसे नाना संकटकाळी बाहेर पडायच्या मार्गातून बाहेर आले, आपल्याला संकटकाळातून बाहेर काढणाऱ्या श्रींना मनोमन वंदन केले आणि तशाच परिस्थितीत कीर्तन चुकवायला नको म्हणून मिळेल त्या गाडीने चिपळूण गाठले व संध्याकाळी गुहागरला पोहोचले. नानांनी तशाही अवस्थेत तो उत्सव साजरा केला. नंतर अक्कलकोटला गेल्यावर श्रींना हा प्रसंग जेव्हा नानांनी सांगितला तेव्हा श्री म्हणाले होते, लक्षात आलं ना हा प्रवास कसा आहे? तरीही अजून बरंच कार्य करून घ्यायचे आहे, म्हणून आपणाला संरक्षण दिले आहे.

पहिल्या भेटीत श्रींनी नानांच्या वडिलांना दिलेले आश्वासन म्हणजे, नारायण हा व्यावहारिक अर्थाने तुमचा मुलगा असेल,पण खऱ्या अर्थाने तो आमचा मुलगा आहे. आम्ही त्याचा हात धरला आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका, हे आश्वासन पुढील काळात श्रींनी शब्दशः पाळले. श्रींना नानांच्या काव्यशक्तीचे मोठे कौतुक होते. ते नेहमी म्हणत, इतर ठिकाणी गीतकार एक असतो, संगीतकार दुसरा असतो, व गायक तिसराच असतो. पण आमच्या काणेबुवांना इतरांची गरज नाही.ते गीत स्वतः तयार करतात, स्वतः चाल लावू शकतात आणि स्वतःच गावु शकतात.

नानांच्या जन्मदिवसाच्याबद्दलही श्रींना कौतुक होते.नानांचा जन्मदिवस व जन्मवेळा आणि पु.विवेकानंदांचा जन्मदिवस व जन्मवेळा एकच आहे.एकदा योगायोगाने नाना त्यांच्या वाढदिवशी अक्कलकोटला असताना यासंबंधीची चर्चा झाली. बोलता बोलता कोणीतरी श्रींना सांगितले की,विवेकानंदांचा जन्म सूर्योदयावेळी झाला आहे.शिवाय विवेकानंद लहानपणी आईच्या हातून पडले होते व त्यांच्या भृकुटीमध्ये जखम झाली होती. त्याची खूण त्यांच्या भृकुटीमध्ये कायमची आठवण म्हणून राहिली होती. हे सर्व योग काणेबुवांना लाभले आहेत. काणेबुवांचा जन्म सूर्योदयाचा, बुवादेखील लहानपणी आईच्या हातून पडले व त्यांच्या भृकुटीमध्ये जखम झाली व ती खूण कायम राहिली आहे. यावर 'श्री' नानांना म्हणाले, विवेकानंदांच्या जन्मदिवशी तुमचा जन्म होतो हा केवळ योगायोग नाही, त्यामागे ईश्वरी योजना असते, संकेत असतो. चार योग तुम्हाला माहित आहेत. आता त्या पुढचे आम्ही सांगतो ते नीट लक्षात घ्या, स्वामींच्या जीवनाला गुरूंचा स्पर्श होता. त्या स्पर्शानेच ते जीवन गतिमान आणि प्रकाशमान झाले. तसा गुरूंचा स्पर्श इथे याही जीवनाला आहे. धर्मप्रचारकाचा पेशा तिथे होता, तसा तो इथेही आहे. तुम्ही जाणतच आहात तरीही आपल्या जन्मदिवशी एक संदेश देऊन ठेवतो आहोत, कुणीतरी मला कीर्तन करायला सांगेल का याची वाट न पाहता आपण संधी घेऊन कीर्तन करायचे, कारण ते आपले कार्य आहे, आपले जीवन आहे. एवढे बोलून 'श्री' एकदम थांबले. त्यांचे दोन्ही हात आशीर्वाद देण्यासाठी वर झाले. श्रींनी जेव्हा स्वतः आपणहून नानांना सांगितले की, विवेकानंदांप्रमाणेच गुरूंचा स्पर्श याही जीवनाला आहे, तेव्हा नानांना झालेला आनंद शब्दात व्यक्त करणे अशक्यच आहे. तो स्पर्श रामकृष्णांचा, तो स्पर्श राम, कृष्ण, बुद्ध, मानवपुत्राचा. तो स्पर्श स्वामी समर्थांचा,तो स्पर्श दत्तात्रेयांचा, तो स्पर्श सर्व शक्तिमान श्रींचा. त्यांच्या कृपेनेच नानांचे सारे जीवन भरले आहे. त्या पूर्णकृपेच्या अनुभूतीचे वर्णन करणारे नानांचे एक गीत आहे. नानांच्या साऱ्या रचनांचा मुकुटमणी ठरू शकेल असे हे गीत आहे.

ती अनुभूती आपणा सर्वांना लाभो या प्रार्थनेसह हे गीत आपण पाहूया.

कार्यक्रम

परमसद्गुरू श्री गजानन महाराज जन्मशताब्दी वर्ष (१७ मे २०१७-१८)
श्री महाराज जन्मकथा संकल्प भारत दौरा

बुवांच्या कीर्तनाचे अग्निहोत्र प्रचार आणि प्रसार हे मुख्य उद्दिष्ट होते. २०१७-१८ हे श्रींचे म्हणजेच परम सद्गुरू श्री गजानन महाराजांचे जन्मशताब्दी वर्ष होते. हे निमित्त साधून किमान १०० ठिकाणी श्रींच्या जन्मकथेचे आख्यान सांगावे व कीर्तनाच्या माध्यमातून अग्निहोत्र सांगावे असा बुवांचा संकल्प होता . या कार्याची सुरुवात श्रींचे जन्मस्थान तसेच गंगा नदी किनारी खरगपूर, कलकत्ता येथे झाली व श्रींनी सुरुवातीचा कालखंड जेथे व्यतीत केला ती राजीम, रायपुर तसेच अमरकंटक हि क्षेत्रे, बिलासपुर, नागपूर, कवठे गुलंद ते अक्कलकोट या बुवांच्या पायी वारीतील अनेक ठिकाणी व भारतभर सर्व प्रमुख पवित्र स्थानांवर बुवांनी संकल्प कीर्तने केली.

संकल्प दौरा कीर्तने

  • क्र. ११४- श्री. महालक्ष्मी मंदीर, कल्याण
  • क्र. ११३- ज्येष्ठ नागरिक संघ, डोंबिवली
  • क्र. ११२- औरंगाबाद
  • क्र. १११- कोंडे, राजापूर
  • क्र. ११०- श्री. आपटे, गोवा
  • क्र. १०९- कराड
  • क्र. १०८- गजानन महाराज मंदिर, उज्जैन
  • क्र. १०७- श्री. रामनवमी उत्सव, आपटा
  • क्र. १०६- श्री. कुलकर्णी, पनवेल
  • क्र. १०५- गणपती मंदिर, डोंबिवली
  • क्र. १०४- हनुमान मंदीर, बदलापूर
  • क्र. १०३- वांगणी, बदलापूर
  • क्र. १०२- बदलापूर, श्री कुवळेकर
  • क्र. १०१- सोलगाव, राजापूर, रत्नागिरी
  • क्र. १००- विश्व अग्निहोत्र दिन समारोह, रत्नागिरी
  • क्र. ९९- श्री. घरत, गणेशपुरी
  • क्र. ९८- श्री. पटवर्धन, कल्याण
  • क्र. ९७- श्री. कौपिनेश्वर देवस्थान, ठाणे
  • क्र. ९६- श्री. गजानन महाराज मंदिर, डहाणू
  • क्र. ९५- वाकवली
  • क्र. ९४- शिवथरघळ
  • क्र. ९३- श्रीवर्धन
  • क्र. ९२- श्री. हरवंदे, महाड
  • क्र. ९१- तळा
  • क्र. ९०- गाणगापूर
  • क्र. ८९- सोनामाता विद्यालय, सोलापूर
  • क्र. ८८- हनुमान मंदिर, श्री. केळकर, नागपूर
  • क्र. ८७- रथसप्तमी उत्सव, श्री. कठाळे, नागपूर
  • क्र. ८६- श्री. काळकर, मुलुंड, मुंबई
  • क्र. ८५- मोरजी, गोवा
  • क्र. ८४- ब्रह्मदेव देवस्थान, ब्रह्माकरमळी, सत्तरी, गोवा
  • क्र. ८३- साखळी, गोवा
  • क्र. ८२- श्री योगेश्वरी देवी संस्थान, म्हापसा, गोवा
  • क्र. ८१- अग्नीहोत्र मंदिर, श्री. आपटे, म्हापसा, गोवा
  • क्र. ८०- शृंगेरी
  • क्र. ७९- दत्तमंदिर, ठाणे
  • क्र. ७८- बालाजी मंदिर, कल्याण
  • क्र. ७७- दत्तजयंती उत्सव, कवठेगुलंद
  • क्र. ७६- उपासनी बाबा आश्रम, साकोरी
  • क्र. ७५- श्री. साईबाबा देवस्थान, शिर्डी
  • क्र. ७४- श्री. मोरया गोसावी देवस्थान उत्सव, चिंचवड
  • क्र. ७३- गणेशवाडी
  • क्र. ७२- श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव, पुणे
  • क्र. ७१- कुरुक्षेत्र
  • क्र. ७०- मथुरा
  • क्र. ६९- महाराष्ट्र भवन दिल्ली
  • क्र. ६८- हृषिकेश (संगम)
  • क्र. ६७- हरिद्वार
  • क्र. ६६- गया
  • क्र. ६५- बुद्धगया
  • क्र. ६४- प्रयाग (त्रिवेणी संगम)
  • क्र. ६३- काशी
  • क्र. ६२- अयोध्या
  • क्र. ६१- सोनामाता मंदिर, सिद्धपुर (मातृगया), गुजरात
  • क्र. ६०- साईमंदिर, भद्रा, अहमदाबाद
  • क्र. ५९- दत्तमंदिर, चांदखेडा, अहमदाबाद
  • क्र. ५८- श्री गिरनार पर्वत पायथा, जुनागड
  • क्र. ५७- प्रभास तीर्थ क्षेत्र, गुजरात
  • क्र. ५६- सोमनाथ मंदीर, गुजरात
  • क्र. ५५- द्वारका, गुजरात
  • क्र. ५४- बेट द्वारका, गुजरात
  • क्र. ५३- नारेश्वर, गुजरात
  • क्र. ५२- गरुडेश्वर, गुजरात
  • क्र. ५१- दहेज, गुजरात
  • क्र. ५०- बडोदा
  • क्र. ४९- श्री परशुराम मंदिर, संगम माहुली, सातारा
  • क्र. ४८- लईराई देवीसंस्थान, शिरगाव, गोवा
  • क्र. ४७- दत्तमंदिर, भोर, महाराष्ट्र
  • क्र. ४६- ब्रह्मानंद स्वामी मठ, कागवाड, महाराष्ट्र
  • क्र. ४५- कवठेगुलंद, कन्यागत महापर्वकाळ समाप्ती उत्सव
  • क्र. ४४- विठ्ठल मंदिर, गणेशवाडी
  • क्र. ४३- चिकुरडे, सांगली
  • क्र. ४२- रावेर, जामखंडी, बेळगाव
  • क्र. ४१- ढोल्या गणपती मंदिर, वाई
  • क्र. ४० कागवाड
  • क्र. ३९ मिरज किल्ला भाग
  • क्र. ३८ दड्डी
  • क्र. ३७ वरणगे पाडळी
  • क्र. ३६ पट्टणकोडोली
  • क्र. ३५ चिपळूण
  • क्र. ३४ श्री क्षेत्र परशुराम
  • क्र. ३३ गणपतीपुळे
  • क्र. ३२ संगमेश्वर
  • क्र. ३१ देवरुख
  • क्र. ३० साखरपा
  • क्र. २९ रत्नागिरी
  • क्र. २८ श्री परशुराम मंदिर, बाणगंगा, वाळकेश्वर, मुंबई
  • क्र. २७ सौरभ कार्यालय बावधन पुणे
  • क्र. २६ श्री राममहाराज भक्तमंडळी, रंकाळा संध्यामठ कोल्हापूर
  • क्र. २५ गुरुमंदिर, अक्कलकोट
  • क्र. २४ सोलापूर
  • क्र. २३ वाघोली
  • क्र. २२ मंगळवेढा
  • क्र. २१ पंढरपूर
  • क्र. २० खर्डी
  • क्र. १९ सांगोला
  • क्र. १८ कुची
  • क्र. १७ मिरज
  • क्र. १६ सांगली
  • क्र. १५ बालाजी मंदिर नागपूर
  • क्र. १४ गजानन महाराज मंदिर, महाल, नागपूर
  • क्र. १३ नागपूर
  • क्र. १२ मुर्तीजापूर (बाळप्पा मठ)
  • क्र. ११ कारंजा (दत्त जन्मस्थान)
  • क्र. १० अमरावती
  • क्र. ९ काटोल (चंडिका मंदिर)
  • क्र. ८ नागपूर (मानेगाव दत्तमंदिर)
  • क्र. ७ अमरकंटक
  • क्र. ६ रायपूर
  • क्र. ५ राजीम (राजीव लोचन मंदिर)
  • क्र. ४ बिलासपूर गजानन महाराज मंदिर
  • क्र. ३ बेल्लूर मठ कलकत्ता
  • क्र. २ दक्षिणेश्वर मठ कलकत्ता
  • क्र. १ खरगपूर (श्रींचे जन्मस्थान)